पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं सांगितलं जातं. या चौथ्या स्तंभाची आजची अवस्था काय आहे, कोणत्या वास्तवाने हा स्तंभ पोखरला जातोय, याची तटस्थपणे चिकित्सा करण्याची गरज निर्माण झालीय. त्यामुळेच आम्ही तमाम पत्रकार मित्रांशी चर्चा केली आणि त्यातूनच चौथा स्तंभाविषयी उपहासगर्भ लिहिण्यासाठी आम्ही उद्युक्त झालो. त्यातून कुणा एकाला टार्गेट करणं (जसं सध्याचे न्यूज चॅनेल्स करतात) हा आमचा हेतू अजिबात नाही. पत्रकारितेचं सध्याचं बेंगरूळ रुप नेटीझन्स समोर आणणं आणि त्यावर चर्चा घडवून आणणं हाच एकमेव उद्देश या पाठीमागं आहे. चॅनेल्सच्या आणि त्यातही मराठी वाहिन्यांच्या बाबतीच बोलायचं झालं तर कुणाला जग जिंकायची स्वप्नं पडतायत, तर कुणाला आपलीच दृष्टी चांगली असल्याचे भास होऊन दुसऱ्यांना उघडा डोळे बघा नीट असा फुकटचा सल्ला द्यावासा वाटतोय. काही जण सामर्थ्य महाराष्ट्राचे असल्याचा धोशा लावतायत, तर काही मी मराठी मी मराठीचा उद्घोष करत टीआरपी खेचतायत. तर काही जण काहीच खास नसतानाही उगाचच बातम्या खास चोवीस तास असा नारा देतायत. एकूणच मराठी वाहिन्यांचं आणि या वाहिन्यांवरून दाखवल्या, बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचं भीषण वास्तव चव्हाट्यावर आणणं आवश्यक आहे. तसे तर या बाबत अधिकार वाणीनं लिहिणारे काही ब्लॉग्ज सुरू आहेत. त्यात आणखी एका ब्लॉगची भर कशाला ? असा प्रश्नही तुम्हाला पडू शकेल. त्यात वावगं काहीच नाही. पण, तरिही मांडण्याची शैली आणि अनुभव, निरीक्षण याच वेगळेपण नक्कीच असू शकतं. याच भूमिकेतून पत्रकारितेतलं गबाळेपण मांडण्यासाठी मी चंबू गबाळे आजपासून तुम्हाला ‘नेट’ भेटणार आहे. तर मित्रांनो, वाचा आणि वाचत राहा....!
- चंबू गबाळे....
Tuesday, May 5, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
रा. रा. चंबू गबाळे,
ReplyDeleteआपण पाठविलेला मेल मिळाला.
ब्लॉग वाचला. आवडला.
कळते-समजतेवर त्याची बातमी दिली आहे.
आपल्या ब्लॉगला मनापासून शुभेच्छा.
लिहिते राहा...